Friday, March 3, 2017

माने अभियांत्रिकीच्या सहा संशोधन प्रकल्पांची निवड !!


 वर्षी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा संशोधन प्रकल्पांची विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे संशोधन अनुदान उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली. यामध्ये मेकॅनिकल विभागामधून प्रा. प्रशांत क्षीरसागर, प्रा. अरुण जावीर, ऑटोमोबाईल विभागातून प्रा.राहुल वाटेगावकर, अणुविद्युत आणि दूरसंचार विभागातून प्रा.सुनील अडूरे, प्रा.इसाक शिकलगार तसेच भौतिकशास्त्र विभागातून प्रा. शिल्पा फलटणे यांच्या प्रकल्पांना मुंबई विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणा करण्यात आली. मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने विविध संशोधन प्रकल्पांची निवड करण्यात येते.
   याअंतर्गत गेल्याचवर्षी प्रा.राहुल राजोपाध्ये, प्रा.अच्युत राउत प्रा.वैभव डोंगरे यांच्या संशोधन प्रकल्पांना अनुदानीत करण्यात आले होते.हे तीन संशोधन प्रकल्प पूर्णत्वास जात असतानाच नवीन सहा संशोधन प्रकल्पांची निवड झाल्याने महाविद्यालयातील गुणवत्तेला चालना मिळाली आहे. यावर्षी मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये प्रा. प्रशांत क्षीरसागर यांनी डिशवॉशिंग मधील मानवी कष्ट कमी करण्याच्या उद्देशाने
डिशवॉशर वरती प्रयोगात्मक संशोधन करून वेळ व चलन बचतीचे मार्ग सुचवणार आहेत. प्रा. अरुण जावीर हे अभियांत्रिकीमध्ये सर्वाधिक वापर होणा-या कपलिंग करिता वेगवेगळ्या शिम  मटेरीयलच्या निवडीवरती प्रयोग करून निष्कर्ष काढणार आहेत. यामध्ये ‘ANSYS’ यासारख्या आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करणार आहेत.
   प्रा.राहुल वाटेगावकर हे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विविध वाहनांच्या डॅंम्परमध्ये एम.आर. फ्लुईड चा वापर करून वाहनामधील व्हायब्रेशन कमी करून वाहन प्रवास अधिक आरामदायक कसा करता येईल यावर संशोधन करणार आहेत. प्रा.सुनील अडूरे हे सौरउर्जेवर आधारित स्वयंचलित ड्रीप इरिगेशनचा वापर करून शेतीमधील पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासंदर्भात कार्य करणार आहेत. प्रा.इसाक शिकलगार हे पोल्ट्री व्यवसायाला उपयुक्त असे अंडी उबवणी यंत्रातील उर्जेचा सुनियोजित वापर होण्याकरिता या यंत्राची सुधारित आवृत्ती बनविणार आहेत तसेच प्रा. शिल्पा फलटणे पदार्थ विज्ञान या विषयांतर्गत जल प्रदूषण कमी करण्यासाठी संशोधन करणार आहेत.
   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन करताना सांगितले कि शेती, पोल्ट्री,वाहन उद्योग,गृहोपयोगी उद्योग,जलशुधीकरण यांसारख्या सर्वसामान्यांशी निगडीत अशा विषयांवरती संशोधन करून अभियांत्रिकीचा उपयोग सर्वसामान्यांना करून देण्यामध्ये या प्राध्यापकांचे संशोधनाअंती मोठे योगदान होईल.संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने यांनी सांगितले कि संशोधन कार्यामध्ये महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले असून यापुढील काळामध्ये सुद्धा प्राध्यापकांना संशोधन सुविधा निर्माण करून देण्यात येतील.
   प्रा.संजय भंडारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांचे सर्वांना मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने यांनी या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.



No comments:

Post a Comment