Friday, March 3, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर संपन्न‼





प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एक आठवड्याचे ग्रामीण विकास विषयक जनजागृती युवक युवती शिबिर निवे बुद्रुक येथे पार पडले.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यसपीठावर पोलीस पाटील श्री. शांताराम इथपे,सचिव श्री. चंद्रकांत यादव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.राहुल बेळेकर तसेच ग्रामस्थ प्रतिनिधी राजवाडे उपस्थित होते. प्रा.राहुल बेळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व जाणून घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामविकासाबाबत कार्य करण्याचे आवाहन केले.या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
   या अंतर्गत निवे बसस्थानक ,स्मशानभुमी,सिद्धेश्वरमंदिर,मराठी शाळा परिसर, निवे सहान ,नागझरी या परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर निवे गावामध्ये सांडपाण्याच्या नियोजानासाठी दोन शोषखड्डे खोदण्यात आले.आरोग्यकेंद्रामध्ये ग्रामस्थांना पोहोचाण्यासाठीची अडचण लक्षात घेऊन रस्ता दुरुस्ती श्रमदानातून करण्यात आली त्याचबरोबर निवे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी विद्यार्थांनी करिअर मार्गदर्शन केले. एक आठवडा चाललेल्या या  शिबीरामध्ये योगा,श्रमदान याचबरोबर रोज व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
  या व्याख्यानमालेमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदस्य सौ. वेदा प्रभुदेसाई यांचे ‘ग्राहक संरक्षण कायदा’ या विषयावर तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्री. विनोद वायंगणकर यांचे ‘अंधश्रद्धा निर्मूलन व सर्पज्ञान’ या विषयावर व्याख्यान लक्षवेधक ठरले.कनिष्ठ महाविद्यालय देवरुखचे श्री. राजेंद्र राजवाडे यांनी युवपिढीसमोरील आव्हाने तर राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. संजय भंडारी यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर या विषयावर अत्यंत समर्पक विचार मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हाध्यक्ष श्री.राहुल मराठे यांनी विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय सेवा योजनेची माहिती दिली.
  सदर शिबीरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले त्याचे संयोजन शाहीद सोलकर, सुशांत धारवाड,समीर रसाळ यांनी केले. शिबीराच्या समारोपप्रसंगी सरपंच श्री.विजय शिंदे, ग्रामस्थ प्रतिनिधी राजवाडे दांपत्य,अनिता गुरव तसेच प्राचार्य डॉ. महेश भागवत उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच श्री.विजय शिंदे यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

  शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रा.विस्मयी परुळेकर,प्रा.माणिक पवार,श्री. समीर यादव, प्रा.गुरुप्रसाद बुर्शे,प्रा सुरेश कोळेकर,विनायक पास्ते याचबरोबर तुषार आग्रे,आदित्य जाधव,निकिता गांगण,जागृती काटे यांनी परिश्रम केले.   

No comments:

Post a Comment