Monday, February 15, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या “आरोहन २०१६” चे शानदार उदघाटन !!

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या आरोहन  २०१६ चे शानदार उदघाटन !!
 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरोहन २०१६या    वार्षिक कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उदघाटन करण्यात आले. संस्थाध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री. रवींद्रजी माने यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या या उदघाटन प्रसंगी  संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉमहेश भागवत, महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, आरोहनचे क्रीडा समन्वयक प्रा. सचिन वाघमारे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रल्हाद गमरे व्यासपीठावर उपस्थित होते.
  महोत्सवाची सुरुवात इशस्तवनाच्या  मंगल सुरांमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे महाविद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आरोहनची क्रीडाज्योत श्री कालीश्री मंदिरात प्रज्वलित करून मिरवणुकीने क्रीडांगणामध्ये आणण्यात आली.  या क्रीडाज्योतीची मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या हस्ते क्रीडांगणामध्ये स्थापना करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विभागवार सुरेख व शिस्तबद्ध संचालन करून मान्यवरांना मानवंदना दिली. याप्रसंगी विद्यार्थी क्रीडाप्रमुखाने  सहभागी विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्ती व निष्ठेची शपथ दिली
  प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळामध्ये खिलाडूवृत्तीचे महत्त्व विषद केले व पुढील दहा दिवस चालणा-या विविध  कला व क्रीडा प्रकारांमधील स्पर्धांमध्ये त्याची जोपासना करावी असे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना या वार्षिक महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले की संचालनासारखी शिस्त ही सर्व स्पर्धांमध्ये आवश्यक आहे.इंजिनियरिंगचे विद्यार्थी आज इतरही क्षेत्रात चमकताना दिसत आहेत त्याचप्रमाणे आपल्यामहाविद्यालयाचे विद्यार्थीही इतर क्षेत्रात आपले ज्ञान व कौशल्य वापरून स्वत:चा व समाजाचा उत्कर्ष घडवू शकतात.
  या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या संचलन प्रकारचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामध्ये ऑटोमोबाईल प्रथम,मेकॅनिकल द्वितीय व कॉम्प्युटर विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला.या क्रीडाप्रकाराचे परीक्षण प्रा.काळे यांनी केले.२१ फेब्रुवारी पर्यंत चालणा-या या महोत्सवामध्ये क्रिकेट,व्हॉलीबॉल,फुटबॉल,टेनिस यांसारख्या मैदानी खेळांबरोबरच कॅरम,पेंटिंग,कविता लेखन,व्यंगचित्रकला यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश असणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी केतन चव्हाण व अनुजा बांदे यांनी केले. क्रीडा विभागप्रमुख प्रा. सचिन वाघमारे यांनी मान्यवर व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment