Wednesday, January 9, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “CTRD 2K18” राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन!!

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “चेन्जिग
टेक्नोलॉजी अॅंड रुरल डेव्हलपमेन्ट”, CTRD २k१८” या तिस-या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
इंजिनीअरिंगच्या विविध शाखामध्ये कार्यरत असणारे संशोधक, व्यावसायिक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांना ग्रामीण भागाच्या विकासासाठी संशोधन करण्यास उद्युक्त कारणे, त्यांनी केलेल्या संशोधनाच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच या सर्वातून मुखत्वे ग्रामीण भागाचा विकास कसा साधता येईल यावर संवाद घडवून आणणे याच उद्देशाने राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने मागील तीन वर्षेपासून हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.यावर्षी परिषदेमध्ये जेजेटीयु राजस्थान, जि. एफ. जि. कॉलेज कर्नाटक, जैन युनिवर्सिटी बेंगलोर, आदर्श इन्स्टिट्यूट बेंगलोर, डीकेटीइ इचलकरंजी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, घोडावत अभियांत्रिकी महाविदयालय कोल्हापूर, सायबर कोल्हापूर, के आय टी कोल्हापूर, फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविदयालय रत्नागीरी, राजेंद्र माने तंत्रनिकेतन आंबव, यासारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयामधून प्राध्यापक व विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
२१ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या भव्य सभागृहामध्ये परिषदेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने
यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी व्यासपीठावर समारंभाचे मुख्य अतिथी मिलिंद दातार, प्राचार्य
डॉ.महेश भागवत, संयोजक डॉ.एस.एन.वाघमारे, समन्वयक प्रा. वैभव डोंगरे तसेच आंबव गावचे माजी
सरपंच बाळ माने उपस्थित होते.उद्घाटन मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर मुख्य अतिथी तसेच सर्व सत्र प्रमुख यांचे महाविद्यायाच्या वतीने पुष्प्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक, व्यावसायिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनीं यावेळी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. प्रशांत क्षीरसागर यांनी केले.यानंतर परिषदेचे संयोजक व मेकनिकॅल विभागप्रमुख डॉ.एस.एन.वाघमारे यांनी परिषदेचा उद्देश
थोडक्यात स्पष्ट केला. प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी ही परिषद इंजिनीरिंग क्षेत्रामध्ये काम
करणा–या सर्वांसाठी प्रेरणा देणारी असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. मुख्य अतिथी व ए आय इ इ, रत्नागिरी चे संचालक मिलिंद दातार हे आपल्या भाषणात म्हणाले कि, टेक्नोलॉजी व ग्रामीण विकास या परस्पर पूरक गोष्टी आहेत. विकास हा आत्मकेंद्रित किवा फक्त पैसा कमावण्यासाठी न राहता तो ग्रामीण व वंचित समाजापर्यंत पोचावा. हा विषय फार संवेदनशील असून यावर परिषद आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे त्यांनी अभिनंदन केले.मा.श्री.रवींद्रजी माने आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान हे विकासाला योग्य दिशा देणारे असावे. तंत्रज्ञानातील बदल हे ग्रामीण विकासाला पूरक असावेत. इथे सादर होणा-या ज्ञानाचा व संशोधनाचा वापर ग्रामीण विकासासाठी व्हावा असे सांगून त्यांनी विविध महाविद्यालयातून आलेल्या सहभागींना शुभेच्छा दिल्या.परिषदेमध्ये यानंतर सत्र प्रमुखांच्या देखरेखीखाली सर्व सहभागींनी आपले शोधनिबंध सादर केले. यामध्ये जवळपास ७० शोधनिबंध सादर केले गेले. कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स व आय टी विभागाचे सत्र प्रमुख म्हणून गद्रे इन्फो टेक प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव गोगटे यांनी काम पहिले. मेकनिकॅल, ऑटोमोबाईल व प्रोडक्शन विभागाचे सत्र प्रमुख म्हणून जीपीआर रत्नागीरीचे प्रा. डी. एम. शिंदे यांनी काम पहिले तर सायन्स व व्यवस्थापन विभागाचे सत्र प्रमुख म्हणून आठल्ये सप्रे महाविद्यालयाचे कॉमर्स विभागप्रमुख डॉ. मगदूम यांनी काम पहिले.
परिषदेच्या सांगता समारंभात सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी
मान्यवरांच्या हस्ते सी डी चे अनावरण करण्यात आले. या परिषदेमध्ये सादर झालेले सर्व शोधनिबंध महाविद्यालयाकडून IJREAM या युजिसी ने प्रमाणित केलेल्या जरनल मध्ये प्रकाशित केले जाणार आहेत.
या परिषदेचे नियोजन महाविद्यालयाच्या मेकनिकॅल विभागाने केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
महाविद्यालयाच्या सर्व शाखातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.
फोटो: परिषदेच्या सी डी चे अनावरण करताना मा.श्री.रवींद्रजी माने , डावीकडून: सचिन वाघमारे, डॉ. महेश भागवत,मिलिंद दातार, डी. एम. शिंदे, डॉ. मगदूम, वैभव गोगटे.

No comments:

Post a Comment