आंबव येथील प्र.शि.प्र.संस्थेच्या राजेंद्र
माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबीर
उत्साहात पार पडले. हे शिबीर नजीकच्या निवे गावी घेण्यात आले.सात दिवसांच्या शिबिरात विद्यार्थी स्वयंसेवकांनी
ग्रामस्वच्छता, समाजसेवा, श्रमदान, बौद्धिक विकास यांचा अनुभव घेतला.शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात पहाटे
योगा, प्राणायाम, शारीरिक व्यायाम व ईश्वर आराधनेने करण्यात येत होती.
नियोजनानुसार दरदिवशी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी
गावातील शिंदे वाडी येथे बंधारा बांधला. निवे गावची ग्रामदेवता वरदानदेवीचा मंदिर
परिसर, तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसर, सहाण, बस थांबा यांची स्वच्छता केली. निवे
गावातील रस्ते स्वच्छ केले. गावातील आश्रमशाळेला भेट देऊन तेथील कामकाज समजून
घेतले. संस्थाध्यक्ष मा. रवींद्र माने यांनी यादरम्याने शिबिराला भेट दिली.शिबिरादरम्यान विविध विषयांवर बौद्धिक
व्याख्याने आयोजित करण्यात आली. यामध्ये ‘काश्मीर भारताचा अविभाज्य भाग’ या
विषयावर प्रा. अरविंद कुलकर्णी, ‘युवकांसामोरील आव्हाने’ या विषयावर श्री. अभिजित
हेगशेट्ये, ‘अन्न-धान्य भेसळ परीक्षण’ या विषयावर डॉ. सागर संकपाळ, ‘हवामानातील
बदलाचे परिणाम’ या विषयावर डॉ. विक्रांत बेर्डे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संध्याकाळच्या सत्रात स्वयंसेवकांनी
घरोघरी जाऊन ‘माहिती दूत’ या मोबाईल अॅप द्वारा गावच्या ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती करून दिली.शिबिराची सागंता संस्थेच्या कार्याध्यक्षा
सौ. नेहा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सरपंच श्री. महेंद्र राजवाडे,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वितेसाठी
प्रा. राहुल बेलेकर, प्रा. विस्मई परुळेकर, प्रा. अच्युत राऊत, प्रा. शूभांगी
कांबळे आणि ‘रासेयो’ चे स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment