Thursday, February 1, 2018

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या “आरोहन२०१८” चा समारोप !!



1) समारोप प्रसंगी आदर्श विद्यार्थीनी म्हणून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागाची कु.शलाका राव हिस  गौरवताना संस्थाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने,कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहा माने,संस्था प्रतिनिधी प्रद्युम्न माने, सन्माननीय अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.अक्षय लिमये आदी मान्यवर
२) उत्तम खेळाडू म्हणून कॉम्प्युटर विभागाचा दिपक निकत यास गौरवताना संस्थाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने,कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहा माने,संस्था प्रतिनिधी प्रद्युम्न माने, सन्माननीय अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.अक्षय लिमये आदी मान्यवर
देवरुख वार्ताहर:
 आंबव येथील  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरोहन २०१८ चा समारोप समारंभ मान्यवरांची उपस्थिती, कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा बक्षीस समारंभ तसेच विद्यार्थी विद्यार्थीनींच्या गीत व नृत्यांनी सजलेली रात्र अशा उत्साही वातावरणात पार पडला.
  समारंभाला या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.पी.प्रदीप (आयएएस,कलेक्टर,रत्नागिरी जिल्हा) व सन्माननीय अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.अक्षय लिमये (मॅनेजर,फिडीलीटी इन्फो.सर्व्हिसेस,पुणे) तसेच आपल्यात असलेल्या विविध कलागुणांमुळे नाव कमावलेले माजी विद्यार्थी समरजित  पाटील,तेजस शिंदे,प्रितेश मंगले,अभिजित गानू,अजय पाटील उपस्थित होते.ह्या सर्वांची उपस्थिती व त्यांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरले. त्याचबरोबर संस्थाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने,कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहा माने,संस्था प्रतिनिधी प्रद्युम्न माने,उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, चंद्रकांत यादव(सेक्रेटरी),श्री.दिलीप जाधव(जॉईंट सेक्रेटरी),श्री.बाळ माने(सरपंच आंबव),श्री.संदीप कदम(तहसीलदार),श्री.सुरेंद्र माने (माजी एसटी डेपो मॅनेजर),प्राचार्य डॉ. महेश भागवत,सर्व विभागांचे विभागप्रमुख तसेच पत्रकार उपस्थित होते.
  कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीवंदन व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.त्यानंतर प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी गतवर्षातील महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना महाविद्यालयाला नुकत्याच मिळालेल्या नॅकच्या बी प्लस मानांकनाचा,एआयसीटीई सीआयआय सर्व्हेमध्ये सलग दुसर्यांदा मिळालेल्या सुवर्णश्रेणीचा तसेच आयएसटीई या संस्थेकडून महाराष्ट्र व गोवा विभागासाठीचा बेस्ट इंजिनीअरिंग कॅम्पस या अॅवॉर्डचा आवर्जून उल्लेख केला.विविध विभागातील विद्यार्थ्यांचे निकाल,त्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेले उल्लेखनीय यश,त्याचबरोबर प्राध्यापकांनी पीएचडी,सेट,एनपीटीईएल सारख्या परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाचाही उल्लेख केला. तसेच महाविद्यालयाने विविध कंपन्यांशी केलेले सामंजस्य करार व त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेले मार्गदर्शनपर कोर्सेस यांची माहिती दिली.
   डॉ.एस.एन.वाघमारे यांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली.प्रमुख पाहुणे श्री.पी.प्रदीप यांनी विद्यार्थ्यांशी हसतखेळत संवाद साधला.जीवनाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे व जीवनात समतोल साधणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.महाविद्यालय कोकणाच्या विकासासाठी कार्यरत असून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख असाच वाढत जावो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.माजी विद्यार्थी श्री. अक्षय लिमये यांनी आपला अनुभव सांगताना आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ग्लोबलायझेशनमुळे परदेशातील कंपन्या भारतात येत असून त्यासाठी कुशल इंजिनीअर व तंत्रज्ञांची गरज भासणार आहे.माने साहेबांनी याचा अचूक वेध घेत आपल्या कठोर परिश्रमांनी,आवडीने व सामाजिक बांधिलकीतून हे महाविद्यालय उभारले आहे.असेच कठोर परिश्रम व झोकून देण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावी असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा,संयम व कठोर परिश्रम हि त्रिसूत्री आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
   श्री माने साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की आंबव सारख्या गावात महाविद्यालय उभारणे हे अतिशय अवघड व आव्हानात्मक काम होते.पण ते आम्ही पेलले व आज त्या छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झालेले पाहताना अतिशय आनंद होत आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांसमोरील उदाहरण आहे. तसेच त्यांच्याप्रमाणे तुमचाही सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा बक्षीस व प्रमाणपत्र वितरण सोहळा मान्यवरांच्या  हस्ते पार पडला. माजी विद्यार्थी समरजित पाटील,तेजस शिंदे,प्रितेश मंगले,अभिजित गानू,अजय पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.आदर्श विद्यार्थी म्हणून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागाची विद्यार्थिनी कु.शलाका राव व उत्तम खेळाडू म्हणून कॉम्प्युटर विभागाचा दिपक निकत यांना गौरवण्यात आले.
  शेवटी  विद्यार्थी विद्यार्थीनिंनी रंगीबेरंगी प्रकाशयोजनेत विविध हिंदी-मराठी गीतांवर नृत्याविष्कार सदर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.डी.देठे तसेच विद्यार्थी स्वप्नील तांबे व सिद्धी सावंत यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.विश्वनाथ गुरव यांनी केले. संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी क्रीडा समन्वयक प्रा.विकास मोरे,सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा.विश्वनाथ गुरव,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रमुखांचे मोलाचे सहकार्य लाभले.  
 

No comments:

Post a Comment