फोटो:- राष्ट्रीय
सेवा योजनेचे विद्यार्थी व प्राध्यापक
उपसरपंच श्री.सुनिल तावडे, ग्रामस्थ प्रतिनिधी श्री.प्रकाश
पर्वते,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.राहुल
बेळेकर आणि प्रा.विस्मयी परुळेकर उपस्थित होते.
विद्यार्थी प्रतिनिधी कु.अभिजित मोहिते यांने
प्रास्ताविक केले. प्रा.राहुल बेळेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व जाणून
घेऊन विद्यार्थ्यांनी ग्रामविकासाबाबत कार्य करण्याचे आवाहन केले.तसेच प्राचार्य डॉ. महेश भागवत
यांनी राष्ट्रीय सेवा योजना देशाच्या विकासात कसा मोलाचा वाटा उचलू शकते हे पटवून
दिले. या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग
नोंदवला.
या अंतर्गत कालीश्री
मंदिर,सिद्धेश्वरमंदिर,वरदानदेवी मंदिर,नागझरी या परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर
निवे आणि आंबव गावामध्ये सांडपाण्याच्या नियोजानासाठी दोन शोषखड्डे खोदण्यात आले.तसेच
ग्रामस्थांसाठी आंबव ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.या
शिबिरामध्ये श्रमदानातून तीन बंधारे बांधण्यात आले. त्याचबरोबर निवे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना
करिअर मार्गदर्शन केले. एक आठवडा चाललेल्या या
शिबीरामध्ये योगा,श्रमदान याचबरोबर रोज व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.या
व्याख्यानमालेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय देवरुख येथील प्रा.अरविंद कुलकर्णी यांचे
“विवेकानंद आणि भारतीय राष्ट्रवाद” या विषयावर तसेच सामाजिक कार्यकर्ते
श्री.युयुत्सु आर्ते यांचे आपत्ती व्यवस्थापन आणि श्री.सदानंद आग्रे यांचे ‘संत
साहित्य काळाची गरज’ या विषयावरील व्याख्याने लक्षवेधी ठरली.श्री.मारुती जोशी यांची
‘अंधश्रद्धा निर्मुलन’ तर श्री.सदानंद भागवत यांनी ‘सामाजिक उद्योगशीलता’ या
विषयावर अत्यंत समर्पक विचार मांडले.
शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रा.विस्मयी
परुळेकर,प्रा.अमोल कुंभार,श्री.समीर यादव याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत धारवट,प्रविण कुडव,तेजस
लेले,सुयोग खेडेकर यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment