मुंबई विद्यापीठाच्या
अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून
त्यामध्ये आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने
अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विभागामध्ये याही वर्षी निकाल विद्यापीठाच्या
सरासरी निकालापेक्षा सरस ठरले आहेत.
अणुविद्युत व दूरसंचार विभागाच्या अंतिम वर्षाचा
निकाल ९५.१६% लागला असून मनोज पवार हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यांत्रिकी
विभागाचा निकाल ९३.५५% लागला असून ओंकार गोमले महाविद्यालयात प्रथम आला. संगणक
विभागाचा निकाल ९३.१०% लागला असून झिलू राणे विभागामध्ये सर्वप्रथम आला. माहिती
तंत्रज्ञान या शाखेचा निकाल ९२.४५% लागला असून अनिकेत गांवकर विभागामध्ये प्रथम
आला. ऑटोमोबाईल विभागाचा निकाल ९१.८४% लागला असून सिद्धेश कुंभार विभागामध्ये
प्रथम आला. महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागाचा निकाल ९५.८३% लागला असून राहुल
जाधव याने विभागामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला.
तसेच या शैक्षणिक वर्षाखेरीस महाविद्यालयातील
एकूण ४२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये कॅंपस प्लेसमेंटद्वारे निवड
झाली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री.रवींद्र माने, कार्याध्यक्षा
सौ.नेहा माने, उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, सचिव श्री. चंद्रकांत यादव, सहसचिव श्री.दिलीप
जाधव,सर्व संचालक, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वृंद यांनी
अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment